Chandrapur News : केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र, सात हजार ४२४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही.
७७९१ शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते आधार संलग्न केले नाही. परिणामी हे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र शासनाने २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्त्वाची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. केंद्र शासनाच्या धरतीवरच राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली.
Aadhaar E-KYC
Farmer E-KYC : अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावे
या योजनेतूनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने त्यांना या पैशांचा वापरही करता येतो.
‘पीएम किसान’ या संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ४९ हजार ३८ शेतकरी आहे. पैकी २ लाख ३८ हजार १८३ शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरले आहे.
Aadhaar E-KYC
Farmer E-KYC : पीक नुकसान भरपाईसाठी ई- केवायसी आवश्यक
या दोन्ही योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
त्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न केले. मात्र अजूनही सात हजार ४२४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही.
लाभापासून वंचित राहण्याची शक्यता
सात हजार ७९१ शेतकऱ्यांनी बँक खाते आधार संलग्न केले नाही. त्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे.
एक टिप्पणी भेजें